आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांची घोषणा दुसरी विश्वचषक खो-खो २०२७ला इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये 

दुसरी विश्वचषक खो-खो २०२७ला इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये

 

आंतरराष्ट्रीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांची घोषणा

 

नवी दिल्ली, २१ जानेवारी-

 

पहिल्या-वहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेच्या यशस्वी समारोपानंतर आंतरराष्ट्रीय तथा खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी २०२७ मधील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे होणार असल्याचे जाहीर केले.

 

भारतीय संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही गटात ट्रॉफी जिंकून पहिल्या विश्वचषक स्पर्धेच्या स्पर्धेनंतरच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे जाहीर केले. यावेळी केकेएफआयचे सरचिटणीस एम.एस. त्यागी, आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनचे सरचिटणीस रोहित हल्दानिया, इज माय ट्रिपचे वीरेंद्र कुमार, केकेडब्ल्यूसीचे सीईओ मेजर जनरल विक्रम देव डोग्रा आणि विश्वचषक विजेते दोन्ही कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियंका इंगळे उपस्थित होते.

 

केकेएफआयचे अध्यक्ष आणि सचिव यांच्याकडे ट्रॉफी सुपूर्द करताना कर्णधारांनी विजयाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

दोन्ही संघांचे प्रशिक्षक सुमित भाटिया, डॉ. मुन्नी जून, प्राची वाईकर (महिला) आणि अश्वनी शर्मा, शिरीन गोडबोले (पुरुष ) यांनीही या स्पर्धेचे आयोजन करून खेळाला जागतिक स्तरावर पोहोचण्यास मदत केल्याबद्दल महासंघाचे आभार मानले.

 

पत्रकारांशी संवाद साधताना अध्यक्ष सुधांशू मित्तल म्हणाले, “ पहिली विश्वचषक खो-खो स्पर्धा खूप यशस्वी ठरली. पुढील विश्वचषक 2026-2027 मध्ये बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे होणार असल्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. दुसरी स्पर्धा पहिल्यापेक्षा मोठी आणि सर्व अपेक्षा ओलांडलेली पाहून आम्हाला अधिक आनंद होईल. आंतरराष्ट्रीय खो खो फेडरेशनचे पुढील अधिवेशन देखील १७ एप्रिल रोजी होणार आहे, ज्यात पुढील चार वर्षांच्या रणनीतीवर चर्चा केली जाईल आणि औपचारिकता ठरविली जाईल.”

 

पुढील खो खो विश्वचषक स्पर्धेचे ठिकाण जाहीर करताना श्री. मित्तल यांनी विश्वचषकाच्या यशाबद्दल विविध राजकारणी आणि मान्यवरांनी अभिनंदन केल्याचा खुलासाही केला. यामध्ये पंतप्रधान

नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक आणि केशव प्रसाद मौर्य, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, समाजवादी पक्ष अध्यक्ष अखिलेश यादव आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे.